Vaishali Takkar Death
Vaishali Takkar Death Team Lokshahi
मनोरंजन

Vaishali Takkar Death: 'ससुराल सिमर का' शो फेम वैशाली ठक्करने इंदूरमध्ये केली आत्महत्या

Published by : shweta walge

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो 'ससुराल सिमर का' ची अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने तणावामुळे आत्महत्या केली आहे. अभिनेत्रीने इंदूर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अभिनेत्रीच्या निधनाच्या बातमीने टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरून पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. ती या प्रकरणाचा तपास करत आहे.

अभिनेत्रीने फाशी देण्यापूर्वी एक चिठ्ठीही लिहिली, जी पोलिसांना मिळाली. या सुसाईड नोटनुसार तिच्या जुन्या प्रियकराकडून होणाऱ्या छळामुळे ती तणावाखाली होती. त्यामुळेच तीने एवढं मोठं पाऊल उचललं. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. अभिनेत्रीने इंदूरच्या साईबाग येथील राहत्या घरी गळफास लावून घेतला. माहिती देताना एसीपी एम रहमान म्हणाले की, अभिनेत्रीने काल रात्री गळफास लावून घेतला. तीच्याकडून सुसाईड नोट सापडली आहे. तिच्या जुन्या प्रियकराकडून तिचा छळ होत असल्याने ती तणावात होती, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

वैशाली ठक्करने प्रसिद्ध शो ये रिश्ता क्या कहलाता है मध्ये संजनाची भूमिका साकारली होती. या शोमधून तीला बरीच ओळखही मिळाली. यानंतर तिने 'ससुराल सिमर का' या शोमध्ये अंजलीची भूमिका साकारली होती. ती ये वादा रहा, ये है आशिकी, ससुराल सिमर का, सुपर सिस्टर, लाल इश्क आणि विष आणि अमृतमध्ये दिसली.

गेल्या वर्षी अभिनेत्रीने एंगेजमेंट तोडली

बातम्यांनुसार, वैशालीची 2021 मध्ये एप्रिल महिन्यात एंगेजमेंट झाली होती. कुटुंबीय आणि जवळच्या लोकांच्या उपस्थितीत अभिनेत्रीची एंगेजमेंट झाली. मात्र, एंगेजमेंटच्या एका महिन्यानंतर वैशालीने तिची सगाई रद्द केली आणि ती यापुढे तिच्या मंगेतराशी लग्न करणार नसल्याचे सांगितले. एंगेजमेंट तुटण्याचे कारण समोर आले नाही.

Ajit Navle : 2 शब्द कांद्यावर बोलण्याऐवजी शेतकऱ्यांवर जर अशाप्रकारची दडपशाही होत असेल तर ही नक्कीच निषेधार्य गोष्ट आहे

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; 16 जणांचा मृत्यू

घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे अजूनही बेपत्ता

पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात अजित पवार गैरहजर

"छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान करेल, त्याला गुडघे टेकायला लावल्याशिवाय राहणार नाही"; नाशिकमध्ये उद्धव ठाकरे कडाडले