थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Devendra Fadnavis) मतदानाला अवघे काही तास उरलेले असतानाच राज्यातील काही नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे. या निवडणुका रद्द करणे हे अत्यंत चुकीचे आहे. अशा पद्धतीने कोणीही कोर्टात जाईल आणि मग निवडणूक पुढे ढकलतील असे कधीच आजपर्यंत झालेलं नाही. कुठला कायदा निवडणूक आयोग काढतेय, कोणाचा सल्ला निवडणूक आयोग घेतेय याची मला कल्पना नाही."
" पण जेवढा माझा कायद्याचा अभ्यास आहे मी अनेक वकिलांशी देखील बोललो त्या सगळ्यांचे मत आहे की अशा पद्धतीने या निवडणुका एखादा व्यक्ती कोर्टात गेलाय म्हणून पुढे ढकलता येत नाही. कायदेशीररित्या या निवडणुका निवडणूक आयोगाने पुढे ढकलल्या आहेत त्या पूर्णपणे चूक आहे. उद्या निवडणूक आहे आणि आज तुम्ही पुढे ढकलता, हे अतिशय चुकीचे आहे. निवडणूक आयोग स्वायत्त असलं तरीही अशाप्रकारे निर्णय घेणं चुकीचंच आहे. याबद्दल रिप्रेझंटेशन आम्ही निवडणूक आयोगाला देऊ." असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Summery
'निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला'
काही निवडणुका रद्द करणं चुकीचं- फडणवीस
निवडणुका पुढे ढकलणं हे चुकीचं झालं- फडणवीस