राज्यात राजकीय भुकंप येऊन सत्तापालट झाल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांचं मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी सातत्याने शिंदे सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करून शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत आहेत.
आज अनेक विकासकामांच्या उद्घाटनासाठी शिंदे गटातील दादा भुसे हे धुळ्यात गेले होते. दरम्यान, विकासकामाच्या लोकार्पणाचा लोकार्पण सोहळा सुरू असतानाच शेतकऱ्यांनी जोरजोरात '50 खोके, मंत्री ओके' अश्या घोषणा देत हातात काळा झेंडा दाखवून दादा भुसे यांचा निषेध केला.