ताज्या बातम्या

Chandu Mama on Raj- Uddhav Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र! चंदू मामा वैद्य यांच्या प्रयत्नांना यश

ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने मराठी अस्मितेला नवा आयाम

Published by : Shamal Sawant

गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरे बंधूंना एकत्रित आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे चंदू मामा वैद्य यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. आजच्या ऐतिहासिक मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही एकाच मंचावर एकत्र दिसणार आहेत. या क्षणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचेही लक्ष लागले आहे. विशेषतः मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर दोन्ही बंधू एकत्र येत असल्याने हा सोहळा ऐतिहासिक ठरणार आहे.

या मेळाव्यापूर्वी काही तास आधी चंदू मामा वैद्य यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "मी अनेक वर्षांपासून हेच सांगत होतो की, भगवान के घर देर है लेकिन अंधेर नही. माझ्या दीर्घकालीन प्रयत्नांना आज यश आलं आहे. तुळजाभवानी मातेच्या कृपेने ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. माझी प्रार्थना आहे की, हे दोघं मिळून महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं भलं करतील."

आजच्या कार्यक्रमात ठाकरे कुटुंबातील अनेक सदस्यांची उपस्थिती असणार आहे. चंदू मामा वैद्य यांनी याची माहिती देताना सांगितले, "माझी बहीण शर्मिला ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबातील सर्वच सदस्य आजच्या या आनंदसोहळ्यात सहभागी होणार आहेत. मंचावर ठाकरे बंधू आणि मंचाखाली ठाकरे परिवार हे एकत्र पाहायला मिळणं, हे खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आहे."

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देताना चंदू मामा वैद्य म्हणाले, "बाळासाहेब आज असते तर त्यांचा आनंद द्विगुणित झाला असता. मी मामा म्हणून सल्ला देण्यापेक्षा त्यांना नेहमीच सांगायचो, वेळ येऊ द्या, सगळं ठीक होईल. आज ती वेळ आली आहे आणि हे दृश्य सर्वांनी पाहावं, याचा मला मनस्वी आनंद आहे." आजच्या या ऐतिहासिक सोहळ्यात शिवसैनिक, मनसैनिक आणि मराठी माणूस एकत्र येणार आहे. गेल्या अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली असून मराठी अस्मितेच्या दृष्टीने ही एक नव्या पर्वाची सुरुवात मानली जात आहे

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी नावाचे वादळ पुन्हा जोमात, 52 चेंडूत 10 चौकार अन् 7 षटकारांसह इंग्लंडला चोपल

Eknath shinde On Thackeray vijayi melava : "...त्यासाठी मनगटात जोर लागतो", ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Raj Thackeray : भाषणानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केली होती दिलगिरी, कारण ऐकून बसेल धक्का...

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."