नाना पटोले सोलापुरमध्ये बोलत होते. यावेळेचे त्यांचे एक वाक्य चर्चेचा विषय बनले आहे. नाना पटोले यांनी बोलताना भाजपावर चांगलाच हल्लाबोल केला आहे.
नाना पटोले म्हणाले की, भाजपाची खरं तर मला कीव येते. महाराष्ट्रात एका काळ्या टोपीवाल्याला राज्यपालपदावर बसवलं होतं. त्या काळ्या टोपीवाल्याने राज्यपालाच्या खुर्चीवर बसून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, सावित्रीबाईंचा अपमान केला. यातून भाजपाची मानसिकता काय आहे ते कळतं. राजीव गांधी यांनी देश कसा चालवतात याचं उदाहरण राजीव गांधींनी घालून दिलं. राजीव गांधी कायमच म्हणायचे की या देशात प्रत्येक व्यक्तीच्या हातात जग आलं पाहिजे. देशाच्या जनतेला लुटणं, त्यांना गरीब करणं आणि पुन्हा त्यांना गुलामीकडे आणणं अशी मानसिकता असलेला भाजपा पक्ष सत्तेवर आहे. भाजपाला या देशाची लोकशाही मान्य नाही. असे नाना पटोले म्हणाले.
तसेच राहुल गांधी यांना पंतप्रधान करणं हे माझं लक्ष्य आहे. त्यामुळे माझं तुमचं सगळ्यांना आवाहन आहे की आपण सगळे त्या दृष्टीने तयारीला लागा. ही लढाई काँग्रेसची आहे. स्वातंत्र्याच्या लढाईत काँग्रेसचा शिपाई लढला तसा या निवडणुकीत लढायचं आहे. आपण काय करु शकतो हे दाखवून द्या. असे नाना पटोले म्हणाले.