Thackeray Bandhu : आज (1 नोव्हेंबर) मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडी एल्गार पुकारणार आहेत. आज मुंबईत (Mahavikas Aghadi Mumbai Morcha) महाविकास आघाडी आणि मनसे आयोगाविरोधात मोर्चा काढणार आहे. या मोर्चाचं सत्याचा मोर्चा असं नामकरण करण्यात आलंय. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राज ठाकरे (Raj Thackeray), आदित्य ठाकरे, अमित ठाकरे या मोर्चाला उपस्थित आहेत. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाषणात मोठं वक्तव्य केलं.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या युतीबाबत मोठं वक्तव्य केलं ते म्हणाले की, "आम्ही एकत्र आलो ते तुमच्यासाठी आणि मराठी माणसासाठी...पुरावे दिल्यावर न्यायालयाने न्याय दिला पाहिजे."