संभाजीनगरला धुक्यामुळं विमानसेवा विस्कळीत झाली आहे. मुंबईहून आलेलं विमान माघारी परतलं. इंडिगो कंपनीची विमानफेरी रद्द करण्यात आलेली आहे. खराब वातावरणामुळे मुंबईवरून आलेले विमान अर्धा तास घिरट्या घालून मुंबईला परतले. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी मुंबईहून उड्डाण घेतल्यानंतर एअर इंडियाचे विमान सकाळी 6 ते 6.30 संभाजीनगरच्या आकाशात घिरट्या घालत होते. मुंबईहून येणारे इंडिगो विमान धुक्यामुळे रद्द करण्यात आले. विमानतळावर दृश्य मानतात कमी झाल्याने धावपट्टीवर उतरण्यासाठी विमानाला सिग्नल मिळत नव्हता. मुंबईला जाणारे 113 प्रवासी विमानाची वाट पहात बसले.