थोडक्यात
आजपासून राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण
महाराष्ट्रात आजपासून पाऊस पुन्हा सक्रिय होणार
(Maharashtra Rain Update) मागील काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही दिवसांपासून ढगाळ वातावरणासह पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत.त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
यातच आजपासून राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार असून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाले आहे. महाराष्ट्रात आजपासून पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे.
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर 30 सप्टेंबरपर्यंत पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवला असून घाटमाथ्यावर 28 आणि 29 रोजी पावसाचा जोर वाढेल.तर पुण्यात 27 ते 29 सप्टेंबर दरम्यान गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.