Siddhi Naringrekar
सध्या राज्यभर थंडीचा कडाका वाढत जात अजून ऋतुमानानुसार विठुरायाला उबदार पोशाख परिधान करण्यास सुरुवात झाली आहे .
कार्तिकी यात्रेच्या प्रक्षाल पूजेनंतर दुसऱ्या दिवशी पासून दरवर्षी देवाला उबदार पोशाख परिधान करण्यास सुरुवात होते.
यामध्ये उब देण्यासाठी देवाला मऊ काश्मिरी शाल आणि डोक्याला रेशमी मुंडासे बांधण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
रात्री शेजारातीनंतर विठुराया जेव्हा निद्रेसाठी जात असतो तेव्हा त्याच्या अंगावरील पोशाख काढण्यात येतो .
देवाचे अंग पुसून घेतल्यावर देवाच्या डोक्यावरील मुकुट काढून तेथे 150 हात लांबीचे हे खास उबदार मुंडासे देवाच्या मस्तकावर वैशिष्ठ्यपूर्ण पद्धतीने बांधण्यात येते.
यानंतर देवाच्या कानाला थंडी वाजू नये म्हणून मस्तकी असलेल्या मुकुटावर सुती उपरण्याची पानपट्टी देवाच्या कानाला बांधण्यात येते.
ही परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली असून साधारण होळीपर्यंत हे उबदार कपडे देवाला घालण्यात येतात .