26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याला आज चौदा वर्षे पूर्ण

Team Lokshahi

चौदा वर्षांपूर्वी देशाच्या आर्थिक राजधानीत पाकिस्तानी दहशतवादी संघटनेच्या दहा तरुणांनी धुमाकूळ घातला होता आणि सलग चार दिवस मुंबई शहर दहशतीच्या विळख्यात अडकले होते.

26/11 Mumbai Attack | Team Lokshahi

या दहशतवादी हल्ल्यात अनेक जवानांसह, निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता.

26/11Mumbai attack | Team Lokshahi

लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेच्या 10 सदस्यांनी मुंबईत चार दिवस 12 गोळीबार आणि बॉम्बस्फोट हल्ले केले.

26/11 Mumbai attack | Team Lokshahi

अजमल कसाब, या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेच्या हल्लेखोराने खुलासा केला की हल्लेखोर हे लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी गटाचे सदस्य होते,आणि त्यांच्यावर पाकिस्तानचे नियंत्रण होते

26/11 mumbai attack | Team Lokshahi

या दहशतवादी हल्ल्यात दक्षिण मुंबईत आठ हल्ले झाले होते. त्यात छत्रपती शिवाजी टर्मिनस, ओबेरॉय ट्रायडंट, ताज पॅलेस आणि टॉवर, लिओपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरिमन हाऊस, मेट्रो सिनेमा, टाईम्स ऑफ इंडिया इमारतीच्या आणि सेंट झेवियर्स कॉलेजच्या मागच्या परिसरात हे हल्ले झाले होते.

26/11 Mumbaiattack | Team Lokshahi

दुसऱ्या दिवशी (२७ नोव्हेंबर) ला २०० कमांडोजचे पथक नवी दिल्लीहून मुंबईला पोहोचले आणि ताज आणि ओबेरॉय हॉटेल येथे बचाव कार्याची जबाबदारी घेतली. सरकारने इमारतीवर तोडफोड करण्याचे आदेश दिले. त्यानंतरच्या तासांमध्ये, तुकड्यांमध्ये स्थलांतरण झाले.

26/11 Mumbai attack | Team Lokshahi

29 नोव्हेंबर रोजी भारतीय कमांडोंनी ताजला सर्व अतिरेक्यांपासून मुक्त केल्याची घोषणा केली.

26/11 Mumbai attack | Team Lokshahi