ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांच्यात का होतोय शाब्दिक वाद?

Shweta Shigvan-Kavankar

क्रिकेटपटू ऋषभ पंत सध्या त्याच्या खेळाव्यतिरिक्त इतर कारणांमुळे चर्चेत आहे.

क्रिकेटर आणि उर्वशी रौतेला यांच्यात सुरू असलेले शाब्दिक वाद लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

उर्वशीने ऋषभ पंतच्या नावाने एका मुलाखतीत एक घटना सांगितली. त्यावरुन हा संपूर्ण वाद सुरू झाला.

मुलाखतीत उर्वशीने सांगितले होते की, जेव्हा ती शूटिंगसाठी वाराणसीहून दिल्लीला गेली होती, तेव्हा मिस्टर आरपी तिला भेटायला आले होते आणि लॉबीमध्ये थांबले होते.

अभिनेत्री म्हणाली की, ती आरपी वाट पाहतोय हे विसरली आणि झोपी गेली. उठल्यावर तिने फोन पाहिला आणि त्यावर १६-१७ मिस्ड कॉल्स होते. नंतर तिने वाट पाहणाऱ्याला मुंबईत भेटायला सांगितले.

ही मुलाखत समोर आल्यानंतर ऋषभने इन्स्टावर पोस्ट केले आणि लिहिले की, काही लोक मजा आणि प्रसिद्धीसाठी खोटे बोलतात.

क्रिकेटरने शेवटी लिहिले, 'सोड मला, बहिण खोट्यालाही एक मर्यादा असते'.

यानंतर उर्वशीनेही प्रतिक्रिया देत लिहिले, 'छोटू भैया, तू बॅट-बॉल खेळायला पाहिजे. मी काही मुन्नी नाही, जी तुझ्यासारख्या पोरासाठी बदनाम होईल.

या दोघांचे हा वाद कधी संपेल माहित नाही. परंतु, नेटकरी त्याच्या वादाचा आनंद लुटण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत.