Maharashtra Jobs Vacancy
Maharashtra Jobs Vacancy

Maharashtra Jobs Vacancy : बेरोजगारांसाठी दिलासा! 70 हजार सरकारी पदांची भरती नव्या पद्धतीने

राज्यातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकार लवकरच सुमारे 70 हजार सरकारी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करणार आहे. ही भरती टप्प्याटप्प्याने होणार
Published by :
Riddhi Vanne
Published on

राज्यातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकार लवकरच सुमारे 70 हजार सरकारी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करणार आहे. ही भरती टप्प्याटप्प्याने होणार असून, यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सुमारे 20 हजार पदे भरली जाणार आहेत, तर उर्वरित पदे विविध शासकीय विभागांमधून भरली जातील.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, भरती करताना उमेदवारांची पात्रता, आवश्यक कौशल्ये आणि कामाचे स्वरूप लक्षात घेण्यात येणार आहे. संपूर्ण प्रक्रिया अधिक सोपी, पारदर्शक आणि तंत्रज्ञानावर आधारित असेल.

सरकार भरती प्रक्रियेत ऑनलाइन अर्ज, डिजिटल कागदपत्र तपासणी आणि डिजीलॉकरसारख्या सुविधांचा वापर वाढवणार आहे. त्यामुळे उमेदवारांना वारंवार कागदपत्रे जमा करावी लागणार नाहीत आणि वेळही वाचेल.

या मोठ्या भरतीमुळे प्रशासन अधिक सक्षम होईल आणि नागरिकांना सरकारी सेवा जलद व प्रभावीपणे मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. पुढील एका वर्षात महाराष्ट्रात प्रशासन सुधारणा आणि रोजगार निर्मितीचे नवे मॉडेल उभे राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. एकूणच, हा निर्णय राज्यातील बेरोजगार युवकांसाठी मोठी संधी घेऊन येणारा ठरणार आहे.

थोडक्यात

  1. महाराष्ट्र सरकार लवकरच सुमारे ७० हजार सरकारी पदांसाठी भरती सुरू करणार.

  2. भरती टप्प्याटप्प्याने होणार.

  3. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे सुमारे २० हजार पदे भरली जातील.

  4. उर्वरित पदे विविध शासकीय विभागांमार्फत भरली जातील.

  5. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले: उमेदवारांची पात्रता, कौशल्ये आणि कामाचे स्वरूप पाहून भरती केली जाईल.

  6. संपूर्ण प्रक्रिया सोप्या, पारदर्शक आणि तंत्रज्ञानावर आधारित राहणार.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com