Pahalgam Terror Attack : भारताच्या पाच मोठ्या निर्णयानंतर, पाकिस्ताननेही घेतलं 'हे' निर्णय

Pahalgam Terror Attack : भारताच्या पाच मोठ्या निर्णयानंतर, पाकिस्ताननेही घेतलं 'हे' निर्णय

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात जवळपास 28 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दहशतवाद्यांकडून पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून मारण्यात आले. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हा हल्ला करण्यात आला. जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.

या हल्ल्यानंतर भारताने कठोर पाऊले उचलत पाच मोठे निर्णय घेतलं. यामध्ये 48 तासांमध्ये पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचा आदेश दिला. पाकिस्तानी नागरिकांसाठी भारतीय व्हिसा बंद, अटारी वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद राहणार, सिंधू पाणी करार स्थगित, भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालय बंद, पाकिस्तानी दूतावासातील आकार कमी करण्याचा आदेश देण्यात आला.

याच पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानकडून देखील भारताविरोधात निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये वाघा अटारी बॉर्डर बंद, भारतीयांचा सार्क व्हिसा रद्द करणार, इस्लामाबादमधील भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांची संख्या 30वर आणणार, भारतीय उच्चायुक्तालयातील लष्कर सल्लागारांना भारतात परतावं लागणार, भारतासोबत सुरू असलेला व्यापार बंद. भारताच्या माध्यमातून इतर कोणत्याही देशासोबत व्यापार नाही , भारतीय विमानांसाठी पाकिस्तानी एअरस्पेस बंद. असे निर्णय पाकिस्तानकडून घेण्यात आले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com