Tharala Tar Mag: सरड्यासारखा रंग बदलणारी प्रिया, सुभेदारांच्या उपाशी ठेवण्याने उघडला सोज्वळ सुनेचा आव; नागराज स्वतःसाठीच खोदला खड्डा
मराठीतला लोकप्रिय सीरियल "ठरलं तर मग" च्या २६ जानेवारी २०२६ च्या भागात प्रियाच्या (तन्वीच्या) घरी खळबळ उडाली. पूर्णा आजीने प्रियाला तिच्या नवऱ्याला जेवणावरून उठवल्याबद्दल खूप सुनावलं. घरातील सर्व सदस्यांनी तिला ओरडलं आणि तिच्या असंस्कृत स्वभावावर बोट ठेवलं. सायलीने तिच्यासाठी कठोर नियम ठरवले की, सर्वांचं जेवण होईपर्यंत प्रिया उपाशी राहील, अगदी विमल ताईंचं जेवण होईपर्यंतही. कल्पना आणि पूर्णा आजींनी या निर्णयाला दुजोरा दिला. पूर्णा आजी म्हणाल्या, "हा अन्नदेवतेचा कोप आहे, तुला उशिरापर्यंत उपासमार सहन करावीच लागेल. नाहीतर घराबाहेर जा." आज तर तिला जेवणच मिळालं नाही, पण भुकेतही तिच्या डोक्यात अश्विनला मस्का मारण्याचे प्लॅन सुरू होते. सायली-अर्जुनांमध्ये प्रियाच्या कारनाम्यांवरूनच बोलणं होत होतं.
दुसरीकडे किल्लेदार घरात नागराज रात्री घराबाहेर पडला. प्रतिमाने अडवलं तरी तो कारण सांगून गेला. रविराजने प्रतिमाला सांगितलं की सुमनला मानसोपचारतज्ज्ञाकडे नेणं गरजेचं आहे. नागराजच्या वागण्यावर दोघांनाही संशय झाला. नागराजच्या फोनमध्ये सुमनच्या अपहरणाचा जुना व्हिडिओ कसा सापडला, हे कोडं उलगडत नव्हतं. नागराजला वाटलं की अर्जुन-सायली सुमनपर्यंत कदाचित पोलिसांच्या फोन ट्रॅकिंगमुळे पोहोचले असावेत. तो प्रियाला फोन करून विचारायचं ठरवलं.
उपाशी तळमळणाऱ्या प्रियाला नागराजचा फोन आला. अश्विन झोपलेला असल्याने ती हॉलमध्ये जाऊन बोलली. दोघेही आपापलं प्रॉब्लेम सांगत होते, पण नागराजला प्रियाचं घर तमाशा ऐकायचा नव्हता. त्याने तिला दुसऱ्या दिवशी भेटायला बोलावलं. भुकेने व्याकुळ प्रिया किचनमध्ये खायला शोधत होती तेव्हा कल्पना आली आणि तिचा प्लॅन फसला.
दुसऱ्या दिवशी सकाळी प्रियानं नाटक सुरू केलं. ती साडी नेसून स्वयंपाक करू लागली, सर्वांसाठी नाश्ता तयार केला आणि अस्मिताला भिजवलेले बदाम दिले. अस्मिताने भाव दिला नाही, पण सायली-कल्पनालाही आश्चर्य वाटलं. अर्जुनलाही तन्वीचं हे रूप धक्कादायक वाटलं. तिने म्हटलं, "मी चांगलं वागण्याचा प्रयत्न करतेय, तुम्हीही दोन पावलं पुढे या." सायलीने संधी देत दुपारचं जेवणही तिच्याकडून करायला सांगितलं आणि लांबलचक मेन्यू सांगितला. सगळेजण तिची मजा बघत बसले. अश्विननं म्हटलं, "तू या लूकमध्ये स्वयंपाकघरात? काहीतरी नवीन खोटेपणा आहे ना?"
नागराज प्रियाला वारंवार फोन करत होता, पण ती कट करत होती. शेवटी सायली-अर्जुन ट्रॅक करू नये म्हणून फोन स्विच ऑफ केला. महिपतला अडकवण्यासाठी तो सुमनचा फोन महिपतच्या बंगल्याबाहेर जाऊन ऑन-ऑफ केला. इन्स्पेक्टर सावंतने हे पकडून अर्जुनला सांगितलं. अर्जुनने चैतन्यला सांगितलं की कोर्टाची परवानगी घेऊन महिपतच्या घरात जायचं. आगामी भागात अर्जुन-सायली महिपतच्या घरात शोध घेतील आणि नागराजविरुद्ध पुरावा सापडेल. नागराजने स्वत:च पायावर कुऱ्हाड मारली आहे.
