Summer Tips : तुम्ही सुद्धा उन्हाळ्यात थंड पाणी पिता का? जाणून घ्या...
डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे
पाणी म्हणजे जीवन असते. आपण पाण्याशिवाय जीवनाची कल्पना करु शकत नाही. पिण्याचे पाणी नेहमी स्वच्छ आणि शुद्ध असावे. आरोग्याबाबत जागरुक असणाऱ्या लोकांना नेहमी हा प्रश्न पडतो की, पाणी गरम प्यावे की थंड प्यावे? विशेषतः उन्हाळ्यात हा प्रश्न अधिक अवघड होतो. सध्या घराघरात वॉटर प्युरिफायर ( Water Purifiers) किंवा फिल्टर (Water Filter) बसवलेला असतो. त्यामुळे फिल्टरची सर्व्हिसिंग एकदा केली म्हणजे फिल्टर स्वच्छ होतो असा आपला समज आहे. फिल्टरचे काम फक्त पाणी गाळण्याचे असल्याने ते पाणी स्वच्छ करत नाही. त्याच्यासाठी पाणी गरम करुनच प्यावे लागते.
पाणी गरम का करावे?
स्वयंपाक करताना भाजी, खिचडी, आमटी वैगेरे शिजवताना आणखीन पाणी टाकण्याची गरज पडते. त्यावेळेस आपण नळाचं थंड पाणी टाकत नाही तर, उकळत गरम पाणी टाकतो. कारण त्यामुळे भाजी छान शिजते त्याचबरोबर भाजीची चव अजून वाढते. मात्र आपण थंड पाणी पितो. पाणी नेहमी 20- 25 मिनिट उकळल्यानंतर पिण्यायोग झाल्यानंतर प्यायल्यास अन्न लवकर पचते. अशी आयुर्वेदाची मान्यता आहे.