तीन वर्षांतून एकदा येते विभुवन चतुर्थी; 'या' पद्धतीने करा गणेशाची पूजा, सर्व दुःख होतील दूर

तीन वर्षांतून एकदा येते विभुवन चतुर्थी; 'या' पद्धतीने करा गणेशाची पूजा, सर्व दुःख होतील दूर

हिंदू दिनदर्शिकेनुसार प्रत्येक महिन्यात २ चतुर्थी येतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. असे मानले जाते की श्रीगणेश भक्तांचे सर्व दुःख दूर करतात.

Vibhuvana Sankashti Chaturthi: हिंदू दिनदर्शिकेनुसार प्रत्येक महिन्यात २ चतुर्थी येतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. असे मानले जाते की श्रीगणेश भक्तांचे सर्व दुःख दूर करतात. भक्तगण आपल्या आराध्य गणपती बाप्पाची मनापासून पूजा करतात आणि त्यांचा आशीर्वाद घेतात. ऑगस्टमध्ये येणारी संकष्टी चतुर्थी म्हणजे विभुवन संकष्टी चतुर्थी. ही चतुर्थी तीन वर्षांनी येत आहे. जाणून घ्या विभुवन संकष्टी चतुर्थीची तिथी, महत्त्व आणि पूजा पद्धती.

विभुवन संकष्टी चतुर्थी व्रत

विभुवन संकष्टी चतुर्थी व्रत 4 ऑगस्ट, शुक्रवार रोजी येणार आहे. मान्यतेनुसार, विभुवन संकष्टी चतुर्थीच्या व्रताच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यास भगवान प्रसन्न होतात. गणपती बाप्पा प्रसन्न झाल्याने भक्तांचे जीवन सुख-समृद्धीने भरून जातात. ज्योतिष शास्त्रानुसार या लोकांच्या कुंडलीत राहू आणि केतूचा प्रभाव आहे. त्यांनी विभुवन संकष्टी चतुर्थीचे व्रत ठेवावे यामुळे हा प्रभाव कमी होतो.

शुभ मुहूर्त

संकष्टी चतुर्थी व्रताच्या दिवशी, भगवान गणेशाच्या उपासनेचा शुभ मुहूर्त 4 ऑगस्टच्या पहाटे 5:39 पासून सुरू होईल आणि सकाळी 7:30 पर्यंत चालू राहील. याशिवाय पंचांगानुसार सकाळी 10.45 ते दुपारी 2.40 या वेळेतही पूजा करता येते. हा मुहूर्त देखील खूप शुभ मानला जातो.

पूजा विधि

मान्यतेनुसार, विभुवन संकष्टी चतुर्थी व्रतात गणेशासोबत चंद्राची पूजा करण्याची विशेष पद्धत आहे. उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत. यानंतर बाप्पाची पूजा करावी. या दिवशी गूळ आणि काळ्या तिळाचे लाडू बाप्पाला अर्पण केले जातात. यासोबतच राहू-केतूचा प्रभाव कमी व्हावा म्हणून पूजेत बाप्पासमोर सिंदूर अर्पण केला जातो.

या मंत्राचा करा उच्चार

पूजेत 'ओम गं गणपतये नमः' चा १०८ वेळा जप करणे खूप शुभ मानले जाते. या मंत्राचा जप केल्याने भक्तांच्या जीवनातून दुःख-पीडा दोन्ही दूर होतात. घरात गणेश यंत्राची स्थापना करण्यासाठीही हा दिवस योग्य आहे. यामुळे घरात सकारात्मकता येते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com