महिला नारळ का फोडत नाहीत; 'हे' आहे कारण

महिला नारळ का फोडत नाहीत; 'हे' आहे कारण

विशेष पूजा, यज्ञ, हवन आणि अनेक शुभ कार्ये नारळाशिवाय अपूर्ण मानली जातात. पण, स्त्रिया पूजा किंवा शुभ कार्यात वापरला जाणारा नारळ फोडू शकत नाहीत.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

Women Don't Break Coconut : विशेष पूजा, यज्ञ, हवन आणि अनेक शुभ कार्ये नारळाशिवाय अपूर्ण मानली जातात. पण, स्त्रिया पूजा किंवा शुभ कार्यात वापरला जाणारा नारळ फोडू शकत नाहीत. ही परंपरा नवीन नसून अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. जेव्हा स्त्रिया पूजेत नारळ देऊ शकतात, तर ते का फोडू शकत नाहीत. यामागचे कारण जाणून घेऊया.

महिला नारळ का फोडत नाहीत; 'हे' आहे कारण
रक्षाबंधनाला 200 वर्षांनंतर घडणार अद्भुत योगायोग, 'या' 3 राशी होतील धनवान

'या' कारणांमुळे महिला नारळ फोडत नाहीत

- पौराणिक कथेनुसार, भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनू या तीन गोष्टी आणल्या. या तिन्ही गोष्टी माणसासाठी वरदान आहेत. याच कारणामुळे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात.

- ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवता नारळात वास करतात असे मानले जाते. तीन देवतांच्या उपस्थितीमुळे नारळ महिलांपासून दूर ठेवला जातो.

- नारळ हे भगवान विष्णूंनी पृथ्वीवर पाठवलेले फळ मानले जाते. ज्यावर देवी लक्ष्मीचा अधिकार आहे. म्हणूनच माता लक्ष्मीशिवाय कोणतीही स्त्री नारळ फोडू शकत नाही.

- नारळ हे बीज मानले गेले आहे आणि स्त्री बीजाच्या रूपात मुलाला जन्म देते, म्हणून नारळ फोडणे स्त्रियांसाठी अशुभ मानले जाते. असं म्हटलं जातं की जर एखाद्या महिलेने नारळ फोडला तर तिला गर्भधारणेत समस्या येतात.

- अशी धार्मिक मान्यता आहे की एकदा विश्वामित्रांनी भगवान इंद्रावर कोपून वेगळा स्वर्ग निर्माण केला आणि त्यानंतरही महर्षींचे समाधान झाले नाही तेव्हा त्यांनी वेगळी पृथ्वी निर्माण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी प्रथम मानवाच्या रूपात नारळ घेतला. ज्या नारळाला मानवी रूप देखील मानले जाते.

- नारळात तीन डोळे बनतात. या तीन डोळ्यांना त्रिनेत्राचे रूप मानले जाते असे शास्त्रात मानले जाते. देवाला नारळ अर्पण केल्याने दुःख आणि वेदना नष्ट होतात. घरामध्ये नारळ फोडल्याने नकारात्मकता दूर होते.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com