Bihar Crime : रोहतासमध्ये वाहन चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; मुख्य सूत्रधारासह सात जण अटकेत
बिहारमधील रोहतास जिल्ह्यात काहीदिवसांपूर्वी दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. या घटनेकडे गांभीर्याने घेत असताना, रोहतासचे पोलिस अध्यक्ष आणि उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रमगंज यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक नेमण्यात आले होते. गुप्त माहिती आणि तांत्रिक सहाय्याच्या मदतीने या वाहन लुटणाऱ्या टोळीपर्यंत पोहोचण्यात पथकाला मोठे यश मिळाले.
पोलिस अधीक्षकांनी सांगितले की," ही टोळी नसरीगंज, करकट, दिनारा आणि अकोधिगोला पोलिस स्टेशन परिसरात सक्रिय होती. अटक करण्यात आलेल्या सात गुन्हेगारांमध्ये टोळीचा नेता नीरज पासवान आणि त्याचे साथीदार लव कुमार उर्फ विशाल कुमार, वीरेंद्र राम उर्फ मैया राम, चिंटू पासवान उर्फ जाटा, सरोज कुमार उर्फ मुड्डा, व्यंकटेश शर्मा आणि करण कुमार यांचा समावेश आहे." अटक केलेल्या गुन्हेगारांकडून एक चारचाकी वाहन, चार बाईक आणि अनेक मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, ही टोळी चोरी आणि दरोड्याच्या घटना घडविण्यासाठी वेगवेगळ्या भागात फिरत असे आणि वाहन दरोडा टाकल्यानंतर ते पळून जात होते.
दौडनगर वळणाजवळील एका ढाब्यावर टोळीतील सदस्य भेटणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर शनिवारी रात्री २ वाजताच्या सुमारास तीन दुचाकीवरून सात जण तिथे आले आणि ढाब्यात घुसले. पोलिसांचे पथक तिथे आधीच उपस्थित होते आणि त्यांनी सर्वांना घटनास्थळी पकडले. अटकेनंतर चौकशी केली असता आरोपींनी कबूल केले की त्यांनी एक संघटित टोळी तयार केली होती आणि रोहतास आणि भोजपूर जिल्ह्यांमध्ये दरोडे आणि चोरी करत होते. पोलिस आता टोळीतील इतर सदस्यांची ओळख पटवत आहेत आणि त्यांना अटक करण्यासाठी छापे टाकत आहेत.