Navi Mumbai : नवी मुंबईमध्ये राजकीय तणाव वाढला; बॅनर ठरतंय चर्चेचा विषय, कुणी लावले हे अद्याप अस्पष्ट

नवी मुंबई महापालिका निकालानंतर घणसोलीत राजकीय तणाव वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Navi Mumbai) नवी मुंबई महापालिका निकालानंतर घणसोलीत राजकीय तणाव वाढल्याचे पाहायला मिळत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर घणसोली परिसरात बॅनर्स झळकल्याचे पाहायला मिळत आहे.

'ज्यांनी ठाकरेंशी गद्दारी केली, त्यांना जनता कधीच माफ करणार नाही” असा मजकूर बॅनरवर पाहायला मिळत आहे. बॅनर्स कोणी लावले याबाबत अद्याप समजले नाही मात्र परिसरात राजकीय तणाव वाढल्याची चर्चा आहे. बॅनरवर एक सुज्ञ घणसोलीकर मतदार असे लिहिण्यात आले आहे.

Summary

  • नवी मुंबईमध्ये राजकीय तणाव वाढला

  • घणसोली परिसरात झळकले बॅनर

  • 'ठाकरेंशी गद्दारी केली तर जनता माफ करणार नाही'

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com