Jayakwadi Dam : मराठवाड्याला दिलासा! जायकवाडी धरणात 81% पाणीसाठा; उन्हाळ्यासाठी चिंता टळली?
मराठवाड्याची जीवनदायिनी मानल्या जाणाऱ्या नाथसागर धरणात सध्या भरघोस पाणी उपलब्ध आहे. सध्या धरणात सुमारे 81 टक्के जिवंत साठा असून गेल्या वर्षीपेक्षा पाण्याची पातळी जास्त आहे. त्यामुळे येणाऱ्या उन्हाळ्यासाठी दिलासा मिळाला आहे. 14 फेब्रुवारीच्या सकाळच्या नोंदीनुसार धरणातील उपयुक्त पाणीसाठा 1760 दलघमीपेक्षा अधिक आहे. मागील वर्षाच्या तुलनेत साठ्यात वाढ झाल्याने शेती, पिण्याचे पाणी आणि उद्योगांसाठी आशादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
नाथसागरच्या कालव्यांमुळे पैठणसह छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेतीला पाणी मिळते. गहू, हरभरा, ज्वारी आणि इतर रब्बी पिकांसाठी हा साठा अत्यंत महत्त्वाचा आहे. शहरांच्या वाढत्या पाणीगरजेसाठी उभारण्यात आलेल्या जलवाहिन्यांनाही या साठ्याचा फायदा होणार आहे.\
तथापि, उन्हाळ्यात तापमान वाढल्यास बाष्पीभवनाचा वेग वाढू शकतो. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यात पाण्यावर ताण येऊ शकतो. योग्य नियोजन आणि काटेकोर वापर केल्यास यंदाचा उन्हाळा तुलनेने सुरळीत जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
थोडक्यात
मराठवाड्याची जीवनदायिनी मानल्या जाणाऱ्या नाथसागर धरणात सध्या भरघोस पाणी उपलब्ध आहे.
सध्या धरणात सुमारे 81 टक्के जिवंत साठा असून गेल्या वर्षीपेक्षा पाण्याची पातळी जास्त आहे.
त्यामुळे येणाऱ्या उन्हाळ्यासाठी दिलासा मिळाला आहे.
14 फेब्रुवारीच्या सकाळच्या नोंदीनुसार धरणातील उपयुक्त पाणीसाठा 1760 दलघमीपेक्षा अधिक आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत साठ्यात वाढ झाल्याने शेती, पिण्याचे पाणी आणि उद्योगांसाठी आशादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.

