Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर पुन्हा वाहतूक ब्लॉक; 31 जानेवारीपासून 'या' तारखेपर्यंत महामार्ग राहणार बंद
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Samruddhi Mahamarg) समृद्धी महामार्गावर पुन्हा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गावरील नागपूर वर्ध्या दरम्यान तांत्रिक कामामुळे वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
‘एमएसआरडी’कडून होणाऱ्या तांत्रिक कामांमुळे वाहतूक 45 ते 60 मिनिटं थांबवण्यात येणार असल्याची माहिती मिळत असून ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याच्या कामांमुळे वाहतूक काही काळ बंद राहणार आहे.
31 जानेवारी ते 3 फेब्रुवारी पर्यंत नागपूर वर्धा दरम्यान 14 टप्प्यात काम चालणार आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी पर्यायी नियोजन करण्याचं प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
Summary
समृद्धी महामार्गावर पुन्हा वाहतूक ब्लॉक
31 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान महामार्ग अंशतः बंद
नागपूर ते मुंबई महामार्गावर सध्या गॅंन्ट्री उभारण्याची कामे सुरू आहेत
