Mumbai
Mumbai

Mumbai : महाराष्ट्र बांग्लादेशी आणि फेरीवाला अतिक्रमण मुक्त लोकशाही मराठीची विशेष मोहीम

आजपासून महाराष्ट्र बांग्लादेश नागरिक मुक्त आणि फेरीवाल्यांचे अतिक्रमण यावर लोकशाहीचे अभियान असणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Mumbai) आजपासून महाराष्ट्र बांग्लादेश नागरिक मुक्त आणि फेरीवाल्यांचे अतिक्रमण यावर लोकशाहीचे अभियान असणार आहे. बांग्लादेशी तसेच फेरीवाल्यांकडून अतिक्रमण होत आहे. राज्यासह मुंबईतील विविध भागात फेरीवाल्यांकडून अतिक्रमण होत आहे.

यावर यापूर्वी अनेकांनी आवाज उठवला आहे. अक्षता तेंडूलकर यांनी यापूर्वी फेरीवाल्यांच्या विरोधात आवाज उठवला होता. अतिक्रमणाविरोधात आमदार, महापौर आणि नगरसेवक कोणती भूमिका घेणार? अनधिकृत फेरीवाले कोणाच्या मदतीने बसतात?

दरम्यान ठाणे नगर पोलीस ठाणे यासंदर्भात पुढील तपास करत आहे. दरम्यान या साऱ्याची जबाबदारी स्वीकारत अतिक्रमण असणाऱ्या ठिकाणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि मनपा सहाय्यक निलंबित होणार का? शिवाय स्थानिक लोकप्रतिनिधी याची जबाबदारी स्वीकारणार का ? हा मुद्दा लोकशाही मराठी उपस्थित करत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com