Mumbai High Court : 'मुंबईकर पुढच्या 10 वर्षात घोड्याने प्रवास करतील'- मुंबई उच्च न्यायालय
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai High Court) मुंबई उच्च न्यायालयाकडून महापालिकेची कान उघडणी करण्यात आली आहे. शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे रस्त्याची वाईट अवस्था झाली आहे. रस्त्यांवरील अतिक्रमणावरुन उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळत असून 'मुंबईकर पुढच्या 10 वर्षात घोड्याने प्रवास करतील' असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाकडून पालिकेची कान उघडणी करण्यात आली आहे.
पवईतील ब्ल्यूमाँट या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. वाढत्या अतिक्रमणाच्या मुद्द्यावर बुधवारी न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठांसमोर सुनावणी पार पडली.
जी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामध्ये रस्त्यावर झोपड्यांचे अतिक्रमण वाढत चालल्याने वाहतूक कोंडी होत असल्यास म्हटले असल्याची माहिती मिळत आहे. अतिक्रमणांविरुद्ध पालिका काहीच का करत नाही? पवईतल्या रस्त्यावरुन 4 गाड्या जाऊ शकत होत्या, आता एकच गाडी जाते' असे न्यायालयाने म्हटलं आहे.
Summary
'मुंबईकर पुढच्या 10 वर्षात घोड्याने प्रवास करतील'
मुंबई उच्च न्यायालयाकडून पालिकेची कान उघडणी
रस्त्यांवरील अतिक्रमणावरुन उच्च न्यायालयाचा संताप
