BCCI | Team India | World Cup
BCCI | Team India | World Cupteam lokshahi

'या' तीन भारतीय खेळाडूंची कारकीर्द उद्ध्वस्त, कारण...

चांगली कामगिरी करूनही वाईट काळ सहन करावा लागला
Published by :
Team Lokshahi

BCCI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) भारतातील क्रिकेट जगताशी संबंधित सर्व उपक्रम राबवते. भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंचे भवितव्य या मंडळाच्या हाती आहे. टीम इंडियात निवड होणे हे कोणत्याही खेळाडूसाठी स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे. अनेक खेळाडू निवडीनंतर स्वत:ला संघात टिकवून ठेवू शकत नाहीत. (bcci ruined 3 players careers)

त्याचबरोबर काही खेळाडू असे आहेत की ज्यांना चांगली कामगिरी करूनही वाईट काळ सहन करावा लागतो. भारतीय संघात असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांची कारकीर्द वाईट काळामुळे किंवा बीसीसीआयच्या सतत दुर्लक्षामुळे उद्ध्वस्त झाली.

BCCI | Team India | World Cup
Income Tax Returns : आयकर भरण्याची संधी हुकली, मग कारवाई होणार?

अंबाती रायुडू

बीसीसीआयमुळे अंबाती रायुडूची कारकीर्द उद्ध्वस्त

टीम इंडियाचा फलंदाज अंबाती रायडू त्याच्या तंत्र आणि कामगिरीसाठी ओळखला जातो. आपल्या कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय क्रिकेट संघात आपले स्थान निर्माण केले. मात्र, तो जास्त काळ संघाचा भाग राहू शकला नाही.

2019 चा विश्वचषक हा त्याच्या क्रिकेट कारकिर्दीचा टर्निंग पॉइंट होता. ICC विश्वचषक 2019 दरम्यान, टीम इंडियामध्ये अंबाती रायडूच्या जागी विजय शंकरला संधी देण्यात आली होती. यावर रायुडू खूश नव्हता. 2019 मध्येच रायडूने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतून निवृत्ती जाहीर केली.

BCCI | Team India | World Cup
Credit Card जितके जास्त तितके नुकसान, कसं ते घ्या जाणून

मनोज तिवारी

बीसीसीआयमुळे मनोज तिवारीची कारकीर्द उद्ध्वस्त

टीम इंडियाला असे अनेक फलंदाज मिळाले, ज्यांनी अल्पावधीतच आपल्या शानदार कामगिरीने सर्वांची मने जिंकली. त्यापैकी एक म्हणजे मनोज तिवारी. मनोज तिवारीने 2008 साली भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर या आक्रमक फलंदाजाला तीन वर्षांनी म्हणजेच २०११ च्या वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर आणखी एक संधी मिळाली.

2017 मध्ये मनोज तिवारीने 127 च्या सरासरीने 507 धावा केल्या होत्या, तरीही त्याला भारतीय क्रिकेट संघात संधी मिळाली नाही. मनोज तिवारी यांनी बीसीसीआय आणि निवड समितीवर सातत्याने दुर्लक्ष केल्याबद्दल तंबी घेतली. मात्र, त्यानंतरही परिस्थिती बदलली नाही आणि मनोज तिवारीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागली. सध्या मनोज तिवारी हे पश्चिम बंगालचे क्रीडा मंत्री आहेत.

मुरली विजय

बीसीसीआयमुळे मुरली विजयची कारकीर्द उद्ध्वस्त

या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू मुरली विजयचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2018 हे वर्ष मुरली विजयच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट काळ होता. त्या वर्षी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला तेव्हा मुरली विजयची फ्लॉप कामगिरी पाहायला मिळाली. त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले.

मात्र, प्रदीर्घ प्रतिक्षेनंतरही मुरली विजयला टीम इंडियामध्ये संधी न मिळाल्याने त्याने निवडकर्त्यांवर (बीसीसीआय) प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली. मुरली विजय म्हणाला, 'किमान मला का वगळण्यात आले हे तरी सांगायला हवे.' या विधानामुळे मुरली विजयच्या क्रिकेट कारकिर्दीला ब्रेक लागला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com