kuldeep yadav
kuldeep yadavteam lokshahi

‘कुलदीप यादव इज बॅक’ तीन विकेट घेत बजावली महत्त्वाची भूमिका

या संधीचे सुवर्णसंधीत रूपांतर करण्याचा या खेळाडूंनी पुरेपूर प्रयत्न केला
Published by :
Shubham Tate

kuldeep yadav : वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने 88 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारतीय फिरकी गोलंदाजी जोडीने चमकदार कामगिरी करत वेस्ट इंडिजवर सहज विजयाची नोंद केली. क्रिकेटच्या इतिहासात असे प्रथमच घडले आहे जेव्हा टी-20 सामन्यातील सर्व विकेट स्पिनरने घेतल्या आहेत. (kuldeep yadav won the hearts of fans with a spectacular comebackplayed an important role three wickets)

kuldeep yadav
PV Sindhu : PV सिंधूने रचला इतिहास, CWG मध्ये पटकावले सुवर्णपदक

या सामन्यात भारतीय संघात अनेक बदल पाहायला मिळाले आणि अनेक खेळाडूंचे पुनरागमन झाले. श्रेयस अय्यर, इशान किशन, कुलदीप यादव, रवी बिश्नोई आदी खेळाडूंना या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. या संधीचे सुवर्णसंधीत रूपांतर करण्याचा या खेळाडूंनी पुरेपूर प्रयत्न केला.

श्रेयस अय्यरने सलामी देताना अर्धशतक झळकावले, तर रवी बिश्नोई आणि कुलदीप यादवने फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवून विकेट घेतल्या. युवा रवी बिश्नोईने केवळ 2.4 षटकांत केवळ 16 धावांत 4 बळी घेतले, तर अनुभवी कुलदीप यादवने 4 षटकांत अवघ्या 12 धावांत 3 बळी घेत प्रदीर्घ काळानंतर शानदार पुनरागमन केले.

kuldeep yadav
'विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी पोलिस यंत्रणा आणि केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर'

या स्पेलमध्ये कुलदीप यादवनेही मेडन ओव्हर टाकली. प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करताना कुलदीप यादवने अशी दमदार कामगिरी करून चाहत्यांची मने जिंकली. सोशल मीडियावर चाहत्यांनी कुलदीप यादवचे कौतुकही केले. अशात येत्या सामन्यांमध्ये कुलदीप यादवला भारतीय संघात संधी मिळणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कुलदीप यादव आणि रवी बिश्नोई यांच्याशिवाय अक्षर पटेलनेही चमकदार कामगिरी केली. अक्षर पटेलनेही 3 षटकात केवळ 15 धावा देत 3 बळी घेतले. त्याने एक विकेटही घेतली. अशा स्थितीत आज आशिया चषकासाठी जाहीर होणाऱ्या भारतीय संघात कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार आणि कोणाला नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com