Lok Sabha Election : ठाकरे गट राज्यातील लोकसभेच्या 'या' 23 जागांवर ठाम?
लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. सध्या जागावाटपांबाबत चर्चा सुरु आहे. यातच संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, काँग्रेसचं हायकमांड दिल्लीमध्ये, आम्ही त्यांच्याशी चर्चा करु. आम्ही जिंकलेल्या 18 जागांवर चर्चा करायची नाही, हे ठरवलं आहे. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्मुला दिल्लीमध्ये ठरणार आहे. कोण किती जागा लढणार हे दिल्लीमध्ये ठरणार आहे. असे राऊत म्हणाले.
याच पार्श्वभूमीवर आता लोकसभा जागावाटपामध्ये शिवसेना 23 जागांवर ठाम आहे. ठाकरे गटाच्या 23 जागा ठरल्या आहेत. ठाकरे गटाने मुंबई 4, पश्चिम महाराष्ट्र 3, कोकण 2, ठाणे 2, पालघर 1, विदर्भ 4, मराठवाडा 5, उत्तर महाराष्ट्रातील एका जागेवार दावा केला आहे.
१)रामटेक
२ )बुलढाणा
३) यवतमाळ वाशीम
४)हिंगोली
५) परभणी
६) जालना
७) संभाजीनगर
८) नाशिक
९)पालघर
१०) कल्याण
११) ठाणे
१२) मुंबई उत्तर पश्चिम
१३)मुंबई दक्षिण
१४) मुंबई ईशान्य
१५) मुंबई दक्षिण मध्य
१६) रायगड
१७)रत्नागिरी सिंधुदुर्ग
१८) मावळ
१९) शिर्डी
२०) धाराशिव
२१) कोल्हापूर
२२) हातकणंगले
22) हातकणंगले - ( स्वाभिमानी शेतकरी संघटनासाठी सोडू शकतात)
23) अकोला - (वंचित बहुजन आघाडीसाठी सोडू शकतात)