दिवाळीच्या दिवशी 3 तासच फटाके फोडायला परवानगी, हायकोर्टाने सांगितले...

दिवाळीच्या दिवशी 3 तासच फटाके फोडायला परवानगी, हायकोर्टाने सांगितले...

मुंबईतील प्रदूषणात वाढ झाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मुंबईतील प्रदूषणात वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई महानगर क्षेत्रातील हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने दिवाळीत फटाके वाजवण्यावर उच्च न्यायालयाने निर्बंध घातले आहेत. त्यानुसार आता केवळ सायंकाळी ७ ते रात्री १० असे 3 तासच फटाके वाजवण्यास परवानगी असणार आहे.

कोर्टाने बांधकामांबाबतही मोठा निर्णय घेतला आहे. सर्वत्र सुरू असलेल्या बांधकामामुळे निर्माण होणारी धूळ प्रदूषणाचे प्रमुख कारण असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. शुक्रवारपर्यंत स्थिती न सुधारल्यास बांधकामांवर बंदी घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.

बांधकाम बंदीबाबत हायकोर्टाकडून शेवटची संधी दिली आहे. शुक्रवारपर्यंत हवेची गुणवत्ता न सुधारल्यास 4 दिवस बांधकाम बंदी सांगण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com