Maharashtra Corona : उस्मानाबादेत एकाचवेळी 19 मृतदेहांवर अंत्यसंस्कार, तरीही मृतदेह रांगेत…
उस्मानाबाद मधून धक्कादायक समोर आले आहे. तब्बल 19 मृतदेहांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार केल्याची घटना घडली आहे.विशेष म्हणजे इतके अंत्यसंस्कार होऊन सुद्धा रांग संपली नव्हती. आणखी 8 मृतदेह रांगेत होते.हे चित्र अक्षरशः हृद्य पिळवटून टाकणारे होते.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. रोज रुग्णांची संख्या व मृतांचा आकडा वाढत चालला आहे. आज उस्मानाबाद शहरानजिक असलेल्या असलेल्या स्मशानभूमीत 19 मृतदेहांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभूमीत जागा अपुरी पडत असल्यामुळे अवघ्या एक-एक फुटावर सरण रचण्यात आली होती. इतकच काय तर सरण रचण्यासाठी लाकडं कमी पडत होती.त्यामुळे कमी लाकडांवरच मृतदेहांवर अंत्यविधी केले गेल्याचे दिसते.
विशेष म्हणजे स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा पुरत नसल्यामुळे 8 मृतदेहांवर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली.