Maharashtra Corona : उस्मानाबादेत एकाचवेळी 19 मृतदेहांवर अंत्यसंस्कार, तरीही मृतदेह रांगेत…

Maharashtra Corona : उस्मानाबादेत एकाचवेळी 19 मृतदेहांवर अंत्यसंस्कार, तरीही मृतदेह रांगेत…

Published by :

उस्मानाबाद मधून धक्कादायक समोर आले आहे. तब्बल 19 मृतदेहांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार केल्याची घटना घडली आहे.विशेष म्हणजे इतके अंत्यसंस्कार होऊन सुद्धा रांग संपली नव्हती. आणखी 8 मृतदेह रांगेत होते.हे चित्र अक्षरशः हृद्य पिळवटून टाकणारे होते.

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. रोज रुग्णांची संख्या व मृतांचा आकडा वाढत चालला आहे. आज उस्मानाबाद शहरानजिक असलेल्या असलेल्या स्मशानभूमीत 19 मृतदेहांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभूमीत जागा अपुरी पडत असल्यामुळे अवघ्या एक-एक फुटावर सरण रचण्यात आली होती. इतकच काय तर सरण रचण्यासाठी लाकडं कमी पडत होती.त्यामुळे कमी लाकडांवरच मृतदेहांवर अंत्यविधी केले गेल्याचे दिसते.

विशेष म्हणजे स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा पुरत नसल्यामुळे 8 मृतदेहांवर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com