पुणे हादरलं! दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये 10 जणांचा बुडून मृत्यू
पुणे | प्रमोद लांडे : राजगुरुनगरमध्ये चासकमान धरणात पोहायला गेलेली चार मुले पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कृष्णामुर्ती फाऊंडेशनच्या सह्याद्री स्कुलची चार मुलं पाण्यात बुडाल्याची माहिती समोर आली आहे. चारही मुलांना बाहेर काढण्यात यश आलं असून चाकण येथील युनिकेअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र त्यानंतर ही चारही मुलं मयत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (10 Drowned Pune)
सह्याद्री स्कुलचे हे सर्व विद्यार्थी असल्यानं आता शाळा प्रशासनावर देखील प्रश्न उपस्थित होत आहेत. सह्याद्री स्कुलमधुन बाहेर पडता येत नसतानाही मुलं पोहायला गेली कशी असा सवाल निर्माण होतोय. तसंच या सर्व घटनेला स्कुल प्रशासनाच्या गलथान कारभार जबाबदार असल्याचं म्हटल्या जातंय.
भाटघर धरणात 5 तरुणी बुडाल्या
भाटघर जवाळील नरेगावात पुण्याहून आलेल्या तरुणी पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. खुशबू लंकेश रजपूत, मनीषा लखन रजपूत, चांदणी शक्ती रजपूत, पूनम संदीप रजपूत आणि मोनीका रोहीत चव्हाण असं धरणात बुडालेल्यांची नावं आहेत.