Aaditya Thackeray : मुंबईतील विकासकामांवरुन अदित्य ठाकरेंचा अप्रत्यक्ष निशाणा
मुंबईसह राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून विशेषतः मुंबई महापालिकेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. याच पार्श्वभूमीवर ‘लोकशाही मराठी’च्या क्रॉस फायर कार्यक्रमात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे.
त्यावेळी ते म्हणाले की, भाजपाला पुर्णपणे ओळखणारे एक प्रांत म्हणजे मुंबई आहे. मुंबई, पुणे , ठाणे, कोल्हापूर याठिकाणी भष्ट्राचार नको आहे, ज्या शहरामध्ये जातीय विष नकोये. मुंबईकरांना माहीत आहे की सर्व समाजांना न्याय देऊ शकणारी, त्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणारी एकमेव व्यक्ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. आता त्यांना राज ठाकरे यांची ताकद मिळाली आहे, पवार साहेबांचे आशीर्वाद आहेत. हे सगळं मिळून पुरेसं आहे. मुंबईप्रेमी लोक आमच्यासोबतच राहतील.
प्रचारामध्ये महाविकास आघाडीचा सहभाग दिसत नाही...
यावेळी ते म्हणाले की, विरोधकांना उठता बसता ममदानी दिसत आहेत. आदित्य ठाकरेंचा नाव न घेता अदानीला टोला केला आहे. लोकांचे हाल बघा, बेस्टचे वाढते भाडं तसेच खड्डे रस्त्याचा घोटाळे यासारखे प्रकरणाकडे लक्ष द्या..
