Pakistan Blast
Pakistan BlastPakistan Blast

Pakistan Blast : 48 तासांत पाकिस्तानवर दुसरा हल्ला ; पाकिस्तानचे 12 सैनिक ठार

मात्र अशातच आता एक नवीन माहिती समोर आली आहे.
Published by :
Shamal Sawant
Published on

पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतला आहे. भारताने पाकिस्तानमधील काही भागांमध्ये हवाई हल्ला (Air Strike) करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे समोर आले आहे. मात्र अशातच आता एक नवीन माहिती समोर आली आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानवर हल्ला करत 14 पाकिस्तानी जवानांचा खात्मा केला आहे. (Pakistan Blast)

बलुचिस्तान लिबरेशन आर्मी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला बोलानमधील माचकुंड येथे करण्यात आला. बलुच लिबरेशन आर्मीच्या स्पेशल टॅक्टिकल ऑपरेशन्स स्क्वॉडने पाकिस्तानी लष्कराच्या वाहनाला लक्ष्य करून हल्ला केला. पाकिस्तानी सैन्य लष्करी कारवाईची तयारी करत असताना हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 7 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

याआधीही बीएलएने पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केला होता, ज्यामध्ये अनेक पाकिस्तानी सैनिक मारले गेले होते. केच जिल्ह्यातील किलाग भागात हा हल्ला झाला. बलुचिस्तानबद्दल पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी म्हणाले की, बलुचिस्तान हा एका बेलगाम घोड्यासारखा आहे, ज्यावर आता पाकिस्तानचे कोणतेही नियंत्रण नाही. मात्र पाकिस्तान आता बलोच लिबरेशन आर्मीवर कोणती कारवाई करणार? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com