Flight Ticket Price Hike : ऐन दिवाळीत एअरलाइन्सच्या तिकीट दरात  वाढ,  दिवाळीत प्रवाशांचे निघणार दिवाळे

Flight Ticket Price Hike : ऐन दिवाळीत एअरलाइन्सच्या तिकीट दरात वाढ, दिवाळीत प्रवाशांचे निघणार दिवाळे

सणासुदीच्या काळात मागणी वाढल्याने ऐन दिवाळीत विमान तिकिटांचे दर (3) ते (5) पटींनी वाढले आहेत, ज्यामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • सणांच्या पार्श्वभूमीवर विमानाचे तिकीट दर गगनाला भिडले

  • ऐन दिवाळीत एअरलाइन्सच्या तिकीट दरात वाढ

  • दिवाळीत प्रवाशांचे निघणार दिवाळे

सणासुदीच्या काळात मागणी वाढल्याने ऐन दिवाळीत विमान तिकिटांचे दर (3\) ते \(5\) पटींनी वाढले आहेत, ज्यामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. मुंबई आणि दिल्लीसारख्या शहरांमधून विमान प्रवासाचे दर अनेक पटींनी वाढले आहेत, ज्यामुळे प्रवास करणे खूप महाग झाले आहे. 

वाढीची कारणे: दिवाळीत लोक आपापल्या गावी जात असल्याने आणि सुट्ट्यांमध्ये प्रवास करत असल्याने विमान प्रवासाची मागणी खूप वाढते, ज्यामुळे कंपन्या तिकिटांचे दर वाढवतात.

दरातील वाढ: काही मार्गांवर तिकिटांचे दर नेहमीच्या किमतीच्या \(3\) ते \(5\) पट झाले आहेत, तर काही ठिकाणी ते \(12,000\) ते \(15,000\) रुपयांपर्यंत पोहोचले आहेत

दिवाळी, छटपूजा या सणांच्या पार्श्वभूमीवर विमानाचे तिकीट दर गगनाला भिडले आहेत. विमानाच्या तिकिटांची वाढती मागणी पाहता एअरलाइन्सने तिकीट दरात तीन ते पाच पट वाढ केली आहे. साधारणपणे लखनऊ-मुंबईचे तिकीट चार ते पाच हजार रुपयांना मिळते. मात्र आता हेच तिकीट 25 हजारांपर्यंत पोहोचले आहे. विमान कंपन्यांच्या मनमानीविरोधात प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. तिकीट दरावर नियंत्रण आणण्याची मागणी होत आहे.

ट्रॅव्हल कंपन्यांच्या वेबसाईटवर लखनऊच्या उड्डाणांच्या सर्चमध्ये 60 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कुटुंबातील चार जणांचा लखनऊ-मुंबई विमान प्रवासासाठीचा खर्च एक लाख रुपये एवढा जात आहे. प्रवासी संघटनांनी केंद्र सरकार आणि नागरी उड्डाण मंत्रालयाकडे तिकीट दरावर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com