जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांवर हल्ले सुरुच; दहशतवाद्यांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांवर हल्ले सुरुच; दहशतवाद्यांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांवर हल्ला करण्यात आला आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांवर हल्ला करण्यात आला आहे. काश्मीरमधील शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी दोन काश्मिरी पंडित बांधवांना नावे विचारली व अंदाधुंद गोळ्या झाडल्या. यामध्ये सुनील कुमार भट्ट यांचा मृत्यू झाला. तर त्यांचा भाऊ गंभीर जखमी आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

माहितीनुसार, सुनील भट्ट आणि त्याचा भाऊ त्यांच्या सफरचंदाच्या बागेत जात होते. यादरम्यान दहशतवाद्यांनी त्यांना त्यांचे नाव विचारले आणि त्यानंतर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. या गोळीबारामध्ये सुनील भट्ट यांचा मृत्यू झाला. तर पक्षींबर नाथ गोळीबारात गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेबाबत भाजप नेते निर्मल सिंह यांनी काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी भ्याड कृत्य केले आहे. सुनील कुमार आपले काम करत होते, मात्र दहशतवाद्यांनी गोळीबार केला. पण, दहशतवाद्यांनी कितीही प्रयत्न केले तरी ते त्यांच्या मनसुब्यांमध्ये कधीच यशस्वी होणार नाहीत, असे म्हंटले आहे.

दुसरीकडे, पीपल्स कॉन्फरन्सचे सज्जाद लोन यांनी काश्मिरी पंडितांवर झालेल्या टार्गेट किलिंगबाबत म्हणाले की, शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी आणखी एक भ्याड हल्ला केला आहे. या हिंसक कृत्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. कुटुंबासाठी माझ्या संवेदना, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com