वर्धा लोकसभेतून बच्चू कडू यांनी लढावे कार्यकर्त्यांची मागणी; बच्चू कडू म्हणाले...

वर्धा लोकसभेतून बच्चू कडू यांनी लढावे कार्यकर्त्यांची मागणी; बच्चू कडू म्हणाले...

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

सूरज दहाट, अमरावती

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आता वर्धा लोकसभेतून बच्चू कडू यांनी लढावे अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याची माहिती मिळत आहे.

यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू म्हणाले की, त्या कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. शेतकऱ्यांच्या संदर्भात, इतर काही प्रश्न असतील किमान केंद्राच्या आयात - निर्यात धोरणाच्या विरोधात कुठेतरी आवाज उठवला गेला पाहिजे. या भावना कार्यकर्त्यांच्या आहेत. मी 2 तारखेपर्यंत माझ्या स्वत:च्या 2 टिम मी वर्धेत पाठवल्या आहेत. त्यासंदर्भात कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन निर्णय घेईन.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com