'...भाजपकडून तेवढा त्रास होतो' बच्चू कडूंचा खळबळजनक आरोप

'...भाजपकडून तेवढा त्रास होतो' बच्चू कडूंचा खळबळजनक आरोप

आपल्या मतदारसंघात भाजप आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप बच्चू कडूंनी भाजपवर केला आहे.
Published by :
shweta walge

प्रहार जनशक्ती पक्षा'चे अध्यक्ष आमदार बच्चू कडूंनी अकोल्यात भाजपवर गंभीर आरोप केला आहे. आपल्या मतदारसंघात भाजप आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप बच्चू कडूंनी भाजपवर केला आहे. भाजपने आपल्यासोबत उभं राहणाऱ्यांची फिल्डिंग लावण्याचे धंदे बंद करावेत, असा थेट हल्लाबोल बच्चू कडू यांनी केला आहे.

काय म्हणाले बच्चू कडू?

आपल्या मतदारसंघात भाजप आपल्याला त्रास देत असल्याचा गंभीर आरोप बच्चू कडूंनी भाजपवर केला आहे. आपल्या मतदारसंघात काँग्रेस आणि इतर पक्षांचा आपल्याला त्रास नाही. मात्र, भाजपचं आपल्याला त्रास देत असल्याचा खळबळजनक आरोप कडूंनी भाजपवर केला. मात्र, आपण त्याची काळजी करत नसल्याचं बच्चू कडूंनी ठणकावले आहे. आपल्याला त्रास देण्यासाठी भाजपनं आणखी दोन आमदार, तीन खासदार लावावेत असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे. याला आपण घाबरणार नसल्याचे ही बच्चू कडू यांनी म्हटले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com