Chandrakant Patil : पालिका निवडणुकीसाठी भाजप सज्ज
Chandrakant Patil : पालिका निवडणुकीसाठी भाजप सज्ज, चंद्रकांतदादांनी सांगितला मास्टरप्लॅन Chandrakant Patil : पालिका निवडणुकीसाठी भाजप सज्ज, चंद्रकांतदादांनी सांगितला मास्टरप्लॅन

Chandrakant Patil : पालिका निवडणुकीसाठी भाजप सज्ज, चंद्रकांतदादांनी सांगितला मास्टरप्लॅन

लोकसभा, विधानसभेपेक्षा नेत्याची खरी निवडणूक ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका असते. लोकशाहीमधील सर्वात महत्त्वाची ही निवडणूक आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात

आज भाजपचा विजयी संकल्प मेळावा पार पडला

दिवाळीनंतर दोन दिवसात आचारसंहिता,

चंद्रकांतदादांनी सांगितला निवडणूक आयोगाचा प्लॅन

लोकसभा, विधानसभेपेक्षा नेत्याची खरी निवडणूक ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका असते. लोकशाहीमधील सर्वात महत्त्वाची ही निवडणूक आहे. जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा कदाचित आज (4 ऑक्टोबर) संध्याकाळपर्यंत होईल. आता कुणीतरी म्हणतील निवडणूक आयोगाशी दादांची चर्चा झाली वाटतं. मी 40 वर्षे यामध्ये घालवली त्यामुळे मी अंदाज मांडला आहे. दिवाळीनंतर दोन दिवसात आचारसंहिता जाहीर होईल, त्यामुळे आपण निवडणुकीच्या तयारीला लागूया, असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी (Chandrakant Patil ZP election statement) म्हटले आहे. आज भाजपचा विजयी संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यात चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीसाठी कानमंत्र दिला.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, 2019 साली ज्यांचे तिकीट नाकारले त्या बावनकुळे यांना 2024 च्या विधानसभा निवडणुकीचे उमेदवार ठरवण्याचे अधिकार मिळाले.निवडणूक ही फास्ट ट्रेन प्रमाणे आहे, प्लॅटफार्मवर जो राहील तो राहील. मात्र, नाराज होऊ नका. राजकारणात प्रयत्नाबरोबर नशीब देखील लागतं. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठा फरक असला पाहिजे. 2017 ची परिस्थिती बदला, त्यासाठी येणाऱ्या दिवाळीचा फायदा करून घ्या. लोकांना भेटून संपर्क वाढवा. निवडणूक महायुती म्हणून लढवायची आहे मात्र शेवटच्या क्षणी कोणता निर्णय घ्यायचा हे वरिष्ठ नेते ठरवतील, असे ते म्हणाले. आमच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही, असे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मागत असलेल्या ठिकाणी आपला चांगला उमेदवार असेल तर मैत्रीत लढू, पण कार्यकर्त्यांचा बळी दिला जाईल असं लढणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

त्यांनी सांगितले 2019 साली उध्दव ठाकरे यांनी थोडा समजूतदार दाखवला असता तर हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शोधावं लागलं असतं, पण ते अडून बसले नाही, तर राज्यात चित्र वेगळं दिसलं असतं. नियती ही नियती असते, सरकार 2019 साली जाणं हा नियतीचा खेळ आहे. 2019 साली उद्धव ठाकरे यांनी हे सगळं करून काय मिळवलं? उतू नको मातू नको, घेतला वसा सोडू नको. निवडणुका होऊन जातील पण पार्टीसाठी काम करत राहील पाहिजे. मी कधीच कोणतं तिकीट मागितलं नाही, नेत्याची इच्छा म्हणजे कार्यकर्त्यांसाठी आज्ञा असल्याचे ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com