Raj Thackeray : भाजपच्या बिनविरोध पॅटर्नची पोलखोल! राज ठाकरेंचा व्हिडिओ पुन्हा वाजला
राज्यात सुरू असलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये (BMC) मोठ्या प्रमाणावर बिनविरोध उमेदवार निवडून आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. भाजप–शिवसेना (bjp-shivsena) महायुतीकडून (Mahayuti) हा प्रकार लोकशाहीला मारक असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह (Kalyan-Dombivli) राज्यभरात तब्बल 70 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची चर्चा सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक उमेदवार भाजपचे (bjp) असल्याचे समोर आले आहे.
उमेदवारांवर दबाव टाकून किंवा आमिष दाखवून त्यांना माघार घ्यायला भाग पाडल्याचा आरोप होत आहे. ठाण्यात मनसेच्या एका उमेदवारानेही माघार घेतल्याने पक्षात नाराजी पसरली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश करण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) मैदानात उतरले आहेत.
राज ठाकरे आगामी सभांमध्ये कॉल रेकॉर्डिंग (Call recording) आणि व्हिडिओ (Video) पुराव्यांद्वारे सत्य जनतेसमोर मांडणार असल्याची माहिती आहे. ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीतील काही नेत्यांनी हे पुरावे त्यांच्याकडे दिल्याचे सांगितले जात आहे. तसेच, या बिनविरोध निवडींविरोधात मनसे न्यायालयात जाणार असून राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेण्याचाही निर्णय घेतला आहे.
राज ठाकरे यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले की, इतक्या मोठ्या संख्येने बिनविरोध निवड झालेली निवडणूक त्यांनी कधीच पाहिली नाही. ही परिस्थिती लोकशाहीसाठी चिंताजनक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
थोडक्यात
राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर बिनविरोध उमेदवार निवडून आले
या परिस्थितीमुळे राजकीय वातावरण तापले असल्याचे पाहायला मिळते
भाजप–शिवसेना महायुतीकडून विरोधकांनी हा प्रकार लोकशाहीला मारक असल्याचा आरोप केला
ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह राज्यभरात तब्बल ७० उमेदवार बिनविरोध निवडून आले
या ७० बिनविरोध उमेदवारांमध्ये सर्वाधिक उमेदवार भाजपचे असल्याचे दिसून आले
विरोधकांनी उमेदवारी प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केला

