Sanjay Shirsat
Sanjay ShirsatTeam Lokshahi

पुन्हा मोठा राजकीय भूकंप, संजय शिरसाटाचं सूचक विधान

अजित पवारांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पडलं आहे. या राजकीय भूकंपामुळे संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला बसला आहे.
Published by :
shweta walge

अजित पवारांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पडलं आहे. या राजकीय भूकंपामुळे संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला बसला आहे. यातच आता महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होणार असल्याच सूचक विधान शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलं आहे. एका माध्यमाशी ते बोलत होते.

काँग्रेसचे १६-१७ आमदार संपर्कात आहेत, असं बोललं जातंय, यामध्ये किती तथ्य आहे? असं विचारलं असता संजय शिरसाट म्हणाले की, “काँग्रेस पक्ष फुटणार आहे, हे नक्की आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकर होणार आहे. त्यामध्ये शिवसेना आणि भाजपाच्या आमदारांना मंत्रिपदं दिली जातील, हेही तेवढंच सत्य आहे.”

पुढे ते म्हणाले की, काँग्रेस कधी फुटतेय आणि ते कधी सत्तेत येतात? यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. पण काँग्रेस फुटणार आहे, हे नक्की आहे. काही काळानंतर काँग्रेसही आमच्याबरोबर दिसेल, असंही शिरसाट म्हणाले.

Sanjay Shirsat
अजित पवार केव्हाही मुख्यमंत्री होऊ शकतात; ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा

शिरसाट यांच्या विधानामुळे पुन्हा राज्यात राजकीय भूकंप होणार का? आणि काँग्रेसमधील कोणता गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होणार? याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com