ताज्या बातम्या
मुंबईत 30 मे पासून 5 टक्के तर 5 जून पासून 10 टक्के पाणी कपातीचा निर्णय
मुंबईत 5 टक्के पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आल्याची माहित मिळत आहे.
मुंबईत 5 टक्के पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आल्याची माहित मिळत आहे. गुरूवार दिनांक ३० मे २०२४ पासून ५ टक्के पाणीकपात, तर बुधवार दिनांक ५ जून २०२४ पासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने हा पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने हा निर्णय घेतला आहे.
सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.