IndiGo Flight Cancellations : सर्वोच्च न्यायालयात तातडीने सुनावणीची मागणी; १,००० हून अधिक उड्डाणे रद्द

IndiGo Flight Cancellations : सर्वोच्च न्यायालयात तातडीने सुनावणीची मागणी; १,००० हून अधिक उड्डाणे रद्द

देशातील हवाई वाहतुकीवर देशभरातील इंडिगो एअरलाईन्सच्या कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे मोठा परिणाम झाल्याने विमान प्रवाशांमध्ये चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

देशातील हवाई वाहतुकीवर देशभरातील इंडिगो एअरलाईन्सच्या कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे मोठा परिणाम झाल्याने विमान प्रवाशांमध्ये चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे. अशातच आता हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात दाखल केले जाणार असल्याची माहिती आहे. या परिस्थितीत सरकारकडे कोणते पर्याय आहेत? याची माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात यावेत, याची माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर केली जावी, अशी मागणी याचिका कर्त्यांकडून कऱण्यात आली आहे. याचिकाकर्त्याचे वकील लवकरच सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या निवासस्थानी पोहोचतील अशी शक्यता आहे. एक विशेष खंडपीठ या प्रकरणावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी स्थापन करण्यात यावे आणि या प्रकरणाची सुनावणी घ्यावी अशी मागणी करण्यात येणार आहे.

IndiGo’मुळे देशभरात उड्डाण व्यवस्था विस्कळीत; तिकीटदर गगनाला भिडले

शुक्रवारी, इंडिगोने (Indigo) दिल्ली विमानतळावरून मध्यरात्रीपर्यंत सर्व देशांतर्गत उड्डाणे रद्द केली. एअरलाइनने ही आतापर्यंतची सर्वात गंभीर परिस्थिती असल्याचे म्हटले आहे. इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी एका व्हिडिओ च्या माध्यमातून या परिस्थितीवर भाष्य केलं आहे.५ डिसेंबर रोजी परिस्थिती सर्वात वाईट होती, १,००० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. पण १० ते १५ डिसेंबर दरम्यान वाहतूक पूर्णपणे सामान्य होण्याची अपेक्षा आहे. असे सांगत त्यांनी सर्व प्रवाशांची मााफीही मागितली.

रेल्वे घोषणा

इंडिगोची विमान सेवा कोलमडल्यानंतर प्रवाशांच्या अडचणींना प्रतिसाद म्हणून, रेल्वे आणि स्पाइसजेटने पावले उचलली आहेत. ११६ अतिरिक्त कोच रेल्वेने ३७ गाड्यांमध्येजोडले आहेत. स्पाइसजेट १०० जास्तीची उड्डाणे पुढील काही दिवसांसाठी घेणार असल्याची माहिती आहे. रेल्वे विभागाकडूनही जास्त मागणी असलेल्या मार्गांवर रेल्वे चालवण्यास मान्यता दिली आहे. यामुळे एकप्रकारे अडकलेल्या प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अतिरिक्त कोच याशिवाय रेल्वेनेदेखील तात्काळ प्रभावाने जोडले जात आहेत. आयआरसीटीसीवर अजूनही जागा उपलब्ध आहेत.(IndiGo)

पायलट असोसिएशन नाराज का आहे?

या निर्णयावर एअरलाइन्स पायलट्स असोसिएशन ऑफ इंडिया (एएलपीए) ने डीजीसीएच्या आक्षेप घेतला आहे. सुरक्षा नियमांमधील हलगर्जीपणा धोकादायक उदाहरण निर्माण करू शकतो. ६३% वाटा देशाच्या हवाई वाहतुकीच इंडिगोचा आहे आणि अशा मोठ्या प्रमाणात उड्डाण रद्द झाल्यामुळे हजारो प्रवासी खोळंबले आहेत. या मुद्द्यावरून संसदेतही गदारोळ झाला.

केंद्र सरकारचे निर्देश

केंद्र सरकारने इंडिगो व्यवस्थापनाला प्रवाशांना तात्काळ पैसे परत करण्याचे आणि भविष्यात असे व्यत्यय येऊ नयेत यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. सततच्या गोंधळानंतर, इंडिगोचे विमान वाहतूक हळूहळू सामान्य होत आहे, परंतु आणखी काही दिवस पूर्णपणे परत येण्यासाठी लागू शकतात.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com