बाबासाहेब पाटील यांच्या 'त्या' वक्तव्यानंतर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया, आजारपणाबद्दल स्पष्टीकरण देत म्हणाले...

बाबासाहेब पाटील यांच्या 'त्या' वक्तव्यानंतर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया, आजारपणाबद्दल स्पष्टीकरण देत म्हणाले...

बीडच्या कार्यक्रमाला धनंजय मुंडे गैरहजर राहिल्याने अनेक चर्चा रंगल्या आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

बीडच्या कार्यक्रमाला धनंजय मुंडे गैरहजर राहिल्याने अनेक चर्चा रंगल्या आहेत. काल संत भगवान बाबा गडाचा नारळी सप्ताहाची सांगता शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर या गावी होणार होता. यासाठी सुरेश धस आणि धनंजय मुंडे एकत्र पाहायला मिळणार होते. मात्र या कार्यक्रमाला धनंजय मुंडे गैरहजर राहिले.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी नांदेड जिल्ह्यातील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना यावर प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले की, त्यांची तब्येत ठिक नाही आहे. त्यांना पॅरालिसिस झाला आहे. बोलता ही येत नाही आहे. आपण दुसरंचे बघतो, मिटिंगला वैगेरे मुंबईला येतात ना.

यावर आता धनंजय मुंडे यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत म्हटले की, आमचे सहकारी, सहकारमंत्री श्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या एका विधानावरून मला अर्धांगवायू झाल्याचे वृत्त काही वाहिन्यांवर प्रसारित केले जात आहे. मुळात मला बेल्स पाल्सी हा आजार दीड महिन्यांपूर्वी झालेला असून त्याचा परिणाम चेहऱ्यावर झाल्याने अजूनही मला बोलायला त्रास होतो. श्री बाबासाहेब पाटील यांची व माझी दोन दिवसांपूर्वी एका बैठकीत भेट झाली होती. त्यांनी माझ्याबद्दल काळजी व्यक्त केली त्याबद्दल आभार.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, मात्र मला झालेला आजार हा अर्धांगवायू नसून बेल्स पाल्सी आहे व त्याचा व इतर काही वैद्यकीय बाबींचा त्रास अजूनही होतो असून बोलायला त्रास आहे. मात्र नव्याने मला कोणताही आजार झालेला नाही. असे धनंजय मुंडे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com