Dharmendra Dealth : धर्मेंद्र यांच्या निधनानंतर देओल कुटुंबातील मतभेद?

Dharmendra Dealth : धर्मेंद्र यांच्या निधनानंतर देओल कुटुंबातील मतभेद?

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे 89 व्या वर्षी निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि अखेर 24 नोव्हेंबर रोजी त्यांनी मुंबईतील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला.
Published by :
Riddhi Vanne
Published on

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे 89 व्या वर्षी निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि अखेर 24 नोव्हेंबर रोजी त्यांनी मुंबईतील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर कुटुंबातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उफाळून आल्याचे दिसत आहे.

अंत्यसंस्कार पूर्णपणे खासगी

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी सर्व अंतिम विधी अतिशय गुप्तपणे पार पाडले.

  • सार्वजनिक अंत्ययात्रा काढण्यात आली नाही

  • मीडियालाही दूर ठेवण्यात आले

  • उपस्थिती अत्यंत मर्यादित ठेवली

रुग्णालयात उपचारादरम्यान हेमा मालिनी आणि ईशा देओल वारंवार भेट देत होत्या. मात्र, धर्मेंद्र यांच्या निधनानंतरची परिस्थिती पूर्णपणे वेगळी दिसली.

  • हेमा मालिनी आणि मुलींना प्रमुख विधींपासून दूर?

  • धर्मेंद्र यांचे पार्थिव घेऊन झालेल्या प्रार्थना सभेत तसेच अस्थी विसर्जन विधीमध्ये

  • हेमा मालिनी, ईशा देओल आणि अहाना देओल उपस्थित नव्हते.

अस्थींचे विसर्जन हरिद्वारच्या हर की पौडी येथे करण्यात आले. पंडित संदीप पराशर यांच्या माहितीनुसार, देओल कुटुंबाने सर्व विधी पूर्णतः खाजगी केले आणि फक्त अत्यंत जवळच्या पुरुष सदस्यांनाच सहभागी होऊ दिले.

कोण होते उपस्थित?

विधींमध्ये सहभाग:

  • सनी देओल

  • बॉबी देओल

  • करण देओल

  • काही इतर निकटवर्तीय

महिला सदस्य, विशेषतः हेमा मालिनी आणि त्यांच्या मुलींची अनुपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. नियमांनुसार महिलांना अस्थी विसर्जनाला उपस्थित राहण्यास कोणतीही मनाई नसतानाही त्यांना दूर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे.

कुटुंबातील जुन्या दऱ्या पुन्हा प्रकर्षाने समोर

धर्मेंद्र यांनी आयुष्यात दोन्ही कुटुंबात सलोखा टिकवण्याचा प्रयत्न केला.

– पहिली पत्नी: प्रकाश कौर

– दुसरे लग्न: हेमा मालिनी

मात्र त्यांच्या निधनानंतर पुन्हा दोन्ही कुटुंबातील दुरावा स्पष्टपणे जाणवू लागल्याचे चित्र दिसत आहे. धर्मेंद्र गेले असले तरी कुटुंबातील मतभेद अद्याप संपले नसल्याचेच यातून दिसून येते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com