Guardian Minister List: पालकमंत्रिपदाबाबत तिढा? बावनकुळे यांचं अजित पवार यांच्याकडे बोट
नागपूरमधून चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला आहे, यावेळी ते म्हणाले की, नागपूर शहर व जिल्हा आणि विदर्भातील 86 हजार हेक्टर झुडपी जंगली जमीनी संदर्भात सुप्रीम कोर्टात केस सुरु आहे. असं असताना विभागीय आतूक्ताकडून झुडपी जंगल जमिनी सोडविण्याचा अहवाल आला आहे. त्यासाठी समिती देखील नेमण्यात आली आहे. असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. पुढे बावनकुळे म्हणाले की, अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना दोन दिवस मंत्रालयात आले नाही. केजरीवाल यांना सपोर्ट करण्यासाठी मोदींवर बोलण्याअगोदर त्यावर आत्मपरीक्षण करण्याची गरज, असं म्हणत बावनकुळे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. तसेच पालकमंत्रीपदाबाबत आज चर्चा होण्याची शक्यता असल्याचं देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितल आहे.
मतदाराबद्दल अजित दादांच्या भूमिकेवर बावनकुळेंची प्रतिक्रिया- म्हणाले..
पुढे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आम्ही जनतेतून निवडून आलो असल्याने आम्ही जनसेवक आहोत.. जनसेवकांनी जनतेसमोर नतमस्तक होऊनच आपला कारभार केला पाहिजे. मतदाराबद्दल अजित दादा काय बोलले मी ऐकले नाही, त्यांनी काय भूमिका मांडली याबद्दल मला बोलायचं नाही, मात्र मतदार हा आमचा सर्वस्व आहे. आम्ही कोणीही राजे नाही तर सेवक आहोत आणि सेवकाच्या भूमिकेतच आम्ही राहणार.. माझी आणि आमच्या सरकारची भूमिका आहे जनताच आमचं मालक आहेत..
सुरेश धस यांच्या कडून केल्या जाणाऱ्या धनंजय मुंडे यांच्या विरोधात टीकेवर बावनकुळेंची भूमिका
सुरेश धस यांच्या कडून केल्या जाणाऱ्या धनंजय मुंडे यांच्या विरोधात टीका केली जात आहे. सुरेश धस यांना मी दोन-तीन वेळा बोललो आहे. आता देवेंद्र फडणवीस सुद्धा त्यांना बोलतील.. त्यांची जी काही मत आहेत त्यांनी आपल्या भूमिका सरकारमध्ये मांडल्या पाहिजे.. जनतेच्या व्यासपीठावर कोणती गोष्ट उजाघर करण्याऐवजी सरकारकडे किंवा पक्षातील लोकांजवळ मांडली पाहिजे..
पालकमंत्रीपदाबाबत आज चर्चा होण्याची शक्यता - बावनकुळे
मागे वफ बोर्डाला दोन कोटी रुपये दिले होते, ते रेकॉर्ड डिजिटलायझेशन करण्यासाठी दिले होते.. वफ बोर्डाच्या कायद्यासंदर्भात काय करायचं केंद्र सरकार त्याबद्दल विचार करत आहे.. लोकसभेची संयुक्त समिती गठीत झाली आहे आणि लवकरचं त्याचा रिपोर्ट येईल.. हिंदू समाजाच्या वफ बोर्डाने जप्त केलेल्या प्रॉपर्टी चुकीच्या पद्धतीने गेल्या आहे त्या परत मिळायला हव्या.. नितेश राणे यांच बोलणं योग्य आहे, याकरिता राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही काम करत आहे. पालकमंत्री पदासाठी चर्चा होणार होती मात्र अजित पवार विदेशात असल्याने यावर ही उपाय काढला जाईल.. आज चर्चा होईल असं मला वाटतं...