अभय योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत वीजबिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले आहे.
अभय योजनेला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अभय योजना 2024 ला ग्राहकांच्या मागणीनुसार 31 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.
आतापर्यंत या योजनेचा लाभ राज्यातील 93 हजार 848 वीज ग्राहकांनी घेतला असून ही 31 मार्चमपर्यंतची मुदतवाढ दिल्यानंतर परत मुदतवाढ न देण्याचा निर्णय महावितरणने घेतला असून थकबाकी न भरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
