Ajit Pawar Death : राजकारणात धडाकेबाज एंट्री ते ऐतिहासिक पक्षफूट,अजित पवारांच्या आयुष्यातील 5 निर्णायक क्षण
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा आज सकाळी अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानात उपस्थित असलेल्या 6 जणांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर सर्वत्र शोककळा पसरली आहे. राजकीय नेते, पदाधिकारी, कलाकार सर्वांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. अजित पवार यांचा राजकीय प्रवास अत्यंत प्रभावशाली होता. राजकीय प्रवास सुरु झाल्यापासून आतापर्यंत अजित पवारांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतला. यातीलच 5 महत्त्वाच्या निर्णयाबाबत आता जाणून घेऊया.
राजकारणात दमदार एंट्री
1982 साली अजित पवार यांनी राजकारणात एंट्री केली. त्यानंतर त्यांनी बारामतीतून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून येत स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण केली. हा त्यांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा टप्पा ठरला. कारण इथूनच त्यांचा राजकीय प्रवास सुरु केला. यानंतर अजित पवार यांनी अनेक निवडणुका लढवल्या. मात्र 1991 मध्ये लढलेली पहिली निवडणूक त्यांच्या आयुष्याला कलाटणी देऊन गेली.
सिंचन व सहकार क्षेत्रात पकड
आम्ही बोलत नाही, करून दाखवतो, असं म्हणतं अजित पवार यांनी बारामतीकरांची आणि संपूर्ण महाराष्ट्राची मनं जिंकली. सिंचन, जलसंपदा आणि सहकार क्षेत्रात अजित पवार यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. याच निर्णयांमुळेच राजकारणात त्यांची पकड आणखी मजबूत झाली. महराष्ट्रातील राजकारणात राज्याच्या जलसंपदा, सिंचन आणि सहकार क्षेत्रात बजावलेल्या निर्णायक भूमिकांमुळे अजित पवार यांचा दबदबा वाढला.
2010 मध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपद
बारामतीकरांचा आमदार म्हणून राजकारणात एंट्री केलेले अजित दादा 2010 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आणि सत्ताकेंद्रात आले. अजित पवार यांची रोखठोक उत्तर देण्याची पद्धत, थेट निर्णय घेण्याची क्षमता आणि प्रशासनावर पकड यामुळे ते राज्य पातळीवर ‘पॉवर सेंटर’ ठरले.
पहाटेचा शपथविधी ठरला टर्निंग पॉइंट
2019 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. अजित पवार यांच्या राजकीय आयुष्यातीलपहाटेचा शपथविधी सर्वात चर्चेचा आणि वादग्रस्त टप्पा ठरला. 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे सुमारे 5:47 वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची राजभवनात शपथ घेतली. त्यांची सत्ता अवघ्या 80 तासांत कोसळली.
काका – पुतणा यांच्यातील फूट
अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये 2023 मध्ये फूट पडली. यानंतर अजित पवार यांनी वेगळा राजकीय मार्ग स्वीकारला. काका आणि पुतण्या यांच्यामध्ये पडलेल्या फूटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक ऐतिहासिक वळण आले.;
