Girish Mahajan : राज ठाकरे यांच्या निर्णयामुळे आमच्या मतांमध्ये मोठी भर पडणार आहे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे. असे राज ठाकरे म्हणाले.
यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गिरीश महाजन म्हणाले की, अतिशय स्वागतार्ह निर्णय माननीय राज ठाकरे यांनी केलेला आहे. त्यांनी बिनशर्त पाठिंबा महायुतीला दिलेला आहे. त्यामुळे निश्चितच एक मोठी आमच्या मतांमध्ये भर ही या निर्णयामुळे पडणार आहे. मला वाटते अतिशय चांगला निर्णय त्यांनी घेतलेला आहे. कुठलेही आपल्या मतांमध्ये विभाजन होऊ नये. कारण आम्ही समविचारी आहोत.
सुरवातीपासून आपल्याला कल्पना आहे. समविचारी आपण सगळे लोक आहोत. एकाच विचाराने आपण सगळं पुढे चाललेलो आहोत. त्याच्यामध्ये विभाजन होऊ नये. मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी त्यांनी विशेष करुन असे म्हटलेलं आहे. मोदीजींवर त्यांचा किती विश्वास आहे त्यांना पुढे करण्यासाठी, त्यांना पंतप्रधान करण्यासाठी मी बिनशर्त पाठिंबा देतो असे त्यांनी वक्तव्य केलं. ते अतिशय स्वागतार्ह आहे. यामुळे आता मतांचे विभाजन होणार नाही. अतिशय अनपेक्षित आकडा महाराष्ट्रातून लोकसभेच्या उमेदवारांचा बघायला मिळेल. असे गिरीश महाजन म्हणाले.