'कुणाच्या पाठीत खंजिर न खूपसता त्यांना एकदाही मुख्यमंत्रीपद मिळवता आलं नाही' गोपीचंद पडळकरांची सुळेंवर बोचरी टीका
ज्या ज्या वेळेस शरद पवारांनी महाराष्ट्राचा दौरा केला त्यावेळेस राज्यात सत्ता येते असं मोठं व्यक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार सुप्रियाताई सुळे यांनी केलं होतं. यावरच सुप्रियाताई तुमच्या वडिलांच्या नेतृत्वाखाली गेली 40-50 वर्ष झाली तुम्ही महाराष्ट्रात काम करताय. राष्ट्रवादी काँग्रेसला तीन अंकी आमदार कधी निवडून आणता आले नाही. अशी बोचरी टीका माजी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, सुप्रियाताई तुमच्या वडिलांच्या नेतृत्वाखाली गेली 40-50 वर्ष झाली तुम्ही महाराष्ट्रात काम करताय. राष्ट्रवादी काँग्रेसला तीन अंकी आमदार कधी निवडून आणता आले नाही. त्यांना त्यांच्या स्वबळावरती विश्वासघात न करता कुणाच्या पाठीत खंजिर न खूपसता एकदाही मुख्यमंत्रीपद त्यांना मिळवता आलं नाही त्यामुळे त्यांनी दौरे करत बसावं. पूर्त राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यातील जनतेने ओळखला आहे. अशी प्रतिक्रिया गोपीचंद पडळकर यांनी आज बुलढाणा येथे दौऱ्यावर आले असताना दिली आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
इंदापूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळेंनी शरद पवारांबाबत केलेलं विधान चर्चेत आलं आहे. “शरद पवार विरोधात गेले की दौऱ्यावर निघतात. पण त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहिती नाही. काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.