आज महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा; हजारो उमेदवार मैदानात

आज महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा; हजारो उमेदवार मैदानात

आज महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आज महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज, 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 20 डिसेंबर रोजी लागणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावागावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी हजारो पोलिस कर्मचारी गावागावामध्ये तैनात असतील. तर संवेदनशील असलेल्या गावांमध्ये अधिकचा फौजफाटा देण्यात आला आहे. याचबरोबर अधिकारी आणि कर्मचारी देखील मतदान यंत्रणेमध्ये हजारोंच्या संख्येनं आहेत.

निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या

सिंधुदुर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196. एकूण- 7,751, अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, जालना- 266, कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली- 452, सातारा- 319, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140,

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com