Amit Shah : राज्यातील डबल इंजिन सरकारमुळे मी असमाधानी; शाह असं का म्हणाले...
थोडक्यात
राज्यातील डबल इंजिन सरकारमुळे मी असमाधानी
शाहंच्या विधानामुळे नव्या भिडूची चर्चा
भाजप काचेच्या घरात राहत नाही – फडणवीस
तुम्ही सध्या राज्यात अस्तित्वात असलेल्या डबल इंजिन सरकारमुळे समाधानी असाल पण मी नाही असे थेट विधान देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे. ते मुंबईत महाराष्ट्र भाजपच्या (Maharashtra BJP) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते नव्या प्रदेश मुख्यालयाचे भूमिपूजन पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. शाह यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात नवा भिडू सहभागी होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यावेळी शाह यांनी राज्यात ट्रिपल इंजन सरकार पाहिजे असे सांगत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत विरोधकांचा असा सुपडा साफ करा की ते दुर्बिण लावूनही सापडता कामा नये.
पक्षाच्या सिद्धांतावर जो चालतो, ज्याच्यात कामगिरी करण्याची ताकद आहे तोच भाजपात मोठा नेता बनू शकतो. कामगिरीच्या बळावरच देशाचे नेतृत्व ठरेल. घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही. नरेंद्र मोदी हे उत्तम उदाहरण आहे. प्रत्येक जिल्ह्यात डिसेंबर २०२६ पर्यंत भाजपाचं कार्यालय असायला हवे अशा सूचनाही यावेळी शाह यांनी केल्या. राज्यात भाजपा कोणत्याही कुबड्यांचा आधारे नाही तर आपल्या मजबूत बहुमतावर चालत आहे. हे फक्त बाकीच्या पक्षांसाठी कार्यालय काम करण्याचे ऑफिस असेल. भाजपासाठी कार्यालय म्हणजे मंदिरच आहे.
भाजप काचेच्या घरात राहत नाही – फडणवीस
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांवक निशाणा साधला. या जागेत अनेक अडचणी होत्या. एक-एक अडचण आम्ही दूर केली. हळूहळू ही जागा आपण मिळवली काही लोकांनी त्यावरही प्रश्नचिन्ह उभं केले, मुंबईत चांगलं प्रदेश कार्यालय असावं अशी आमची इच्छा होती’ जागा बळकावण्याची सवय असणाऱ्यांनी आमच्यावर टीका करू नये असं म्हणत फडणवीसांनी भाजप काचेच्या घरात राहत नाही,हमारे उपर पत्थर फेकने का प्रयास मत करना असा खोचक टोला विरोधकांना लगावला.
