Weather Update :  राज्यात पावसाचा तीव्र इशारा!
Weather Update : राज्यात पावसाचा तीव्र इशारा!Weather Update : राज्यात पावसाचा तीव्र इशारा!

Weather Update : राज्यात पावसाचा तीव्र इशारा! प्रशासनाने जारी केला अलर्ट

भारतीय हवामान विभागाने राज्यावर यलो आणि हाय अलर्ट जारी केला असून, पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात

  • राज्यातील शेतकऱ्यांसाठी संकटाचे वातावरण निर्माण झाले आहे

  • कारण सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

  • भारतीय हवामान विभागाने राज्यावर यलो आणि हाय अलर्ट जारी

Indian Meteorological Department : राज्यातील शेतकऱ्यांसाठी संकटाचे वातावरण निर्माण झाले आहे, कारण सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यावर यलो आणि हाय अलर्ट जारी केला असून, पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यभर पाऊस सुरू आहे, आणि १ नोव्हेंबरनंतरही तो थांबलेला नाही. मुंबई, विदर्भ, मराठवाडा आणि अन्य भागांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. विशेषतः कोकण, मुंबई, नाशिक, धुळे आणि रायगडसह इतर जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची वर्तमन स्थिती आहे. मोंथा चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, ज्यामुळे पावसाचा जोर वाढला आहे.

शेतकऱ्यांवर अतिवृष्टीचा मोठा परिणाम झाला आहे. गोंदिया आणि जालना जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे धानाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीनंतरही सरकारने जाहीर केलेल्या मदतीचा एकही रुपया आलेला नाही, त्यामुळे त्यांच्यात नाराजीचे वातावरण आहे. राज्यभर अतिवृष्टीचे संकट असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com